वय म्हणजे काय, हे मला तर काही कळत नाही,
पण माझ्या कळण्या-नकळण्यानं ते वाढायचंही टळत नाही...
वय म्हणजे कदाचित वाढत जाणारी सावली असावी,
किंवा असावं उमलत्या कळीचं झालेलं डौलदार फूल,
भ्रमराला जशी गंधाची, तशी
बालपणाला तारुण्याची चाहूल...
काय करू,शब्दात या वयाची व्याख्याही बसत नाही,
वय म्हणजे काय, हे मला खरंच कळत नाही...
वय म्हणजे चंद्रकोरीचं कलेकलेने वाढणं,
की पुनवेच्या रात्री चंद्र अन तारकांचं लख्ख चांदणं?
पण मग इतकं ’सुंदर’ वय वाढलं की आपण सुखावत का नाही?
वय म्हणजे काय, हे मला तर अजिबातच कळत नाही...
वय म्हणजे बीजांकुरातून वटव्रुक्ष विस्तारलेला,
किंवा वय म्हणजे सुरवंट ’फुलपाखरू’ झालेला?
पण मग त्या फुलपाखरासारखं आपण स्वच्छंद बागडत का नाही?
वय म्हणजे काय, हे मला तर काही कळत नाही...
मी तर बुवा एक ठरवलंय,आहे तो क्षण यथेच्छ जगायचं,
आपलं आयुष्य इंद्रधनूच्या रंगांनी भरून टाकायचं,
कारण कितीही खटाटोप केला तरी वय म्हणजे काय, हे मला कधीच कळणार नाही,
पण माझ्या कळण्या-नकळण्यानं ते वाढायचंही टळणार नाही...
Saturday, December 11, 2010
Monday, October 4, 2010
बहुतेक मी तुझ्या प्रेमात पडले होते......

बहुतेक मी तुझ्या प्रेमात पडले होते......
सगळं जग मला नवं नवंसं वाटत होतं,
तू, तुझा सहवास..सारं हवंहवंसं वाटत होतं,
तुझ्या डोळ्यात तुझ्या-माझ्या नकळत मी हरवत होते,
बहुतेक मी तुझ्या प्रेमात पडले होते......
तुझ्या केवळ आठवणीने मी मोहरून जात होते,
तुझ्या चाहुलीने मन शहारून जात होते,
रात्री स्वप्नातसुद्धा फक्त तुलाच बघत होते,
बहुतेक मी तुझ्या प्रेमात पडले होते......
तू नसताना तुझेच भास,
वेड्या या मनाला तुझाच ध्यास,
माझ्या या स्वप्नवेड्या जगात मी क्षणोक्षणी रमत होते,
बहुतेक मी तुझ्या प्रेमात पडले होते......
खूप वेळा ठरवायचे की तुला एकदा सांगायचंय,
तुझ्या-माझ्या जगात एकदा तुझ्यासोबत हरवायचंय,
तू समोर आलास की मात्र शब्दच माझे संपत होते,
बहुतेक मी तुझ्या प्रेमात पडले होते......
आणि अचानक एक दिवस.....तू आलास,
परदेशी नोकरी मिळाल्याचा आनंद तुझ्या चेहर्यावरून ओसंदून वाहत होता,
’तुला कसं कळलं?’ या तुझ्या प्रश्नातला तो भाबडा भाव मला तेव्हाही आवडत होता,
माझ्याही डोळ्यातून नकळत ’आनंदाश्रू’ वाहत होते,
कारण मी तुझ्या प्रेमात पडले होते......
तू माझं सर्वस्व असलास तरी मी तुझी मैत्रीणच होते,
म्हणूनच तुझ्या दूर जाण्याचं दुःखही हसत हसत झेलत होते,
तू खूश होतास यात सगळं आलं,म्हणून स्वतःला सावरत होते,
कारण तेव्हा मी तुझ्या प्रेमात पडले होते......
हळूहळू तू माझ्या दूर निघून गेलास,
जाताना या डोळ्याना एक सुंदर स्वप्न देऊन गेलास...
तू नाहीस म्हणून मी काही जगणं सोडलेलं नाही,
तुझ्या प्रेमानंच हे जगण्याचं शहाणपण दिलं होतं रे मला,
जेव्हा मी तुझ्या प्रेमात पडले होते......
आणि अजूनही मी तुझी वाट पाहतेय,
तुझ्या आठवणींच्या गर्दीत स्वत:चं एकटेपण घालवतेय,
तू नक्की परत येशील असा विश्वास आहे माझा,
प्रत्येकवेळी देवाला तुलाच तर मागत होते,
जेव्हा ’कधीतरी’ मी तुझ्या प्रेमात पडले होते!!!!!!!!!!
Sunday, September 5, 2010
अजूनही....
अजूनही कधी कधी तू येशील असं वाटतं,
तुझ्या कल्पनेनेसुद्धा आभाळ डोळ्यात दाटतं...
नंतर सुरु होतो तो अविरत बरसणारा उनाड पाऊस...
तो पाऊस, त्या जलधारा...सारं काही तसंच आहे अजूनही...
तोच रस्ता,त्याच वाटा...खुणावतात अजूनही...
पण का कोण जाणे मला हे सारे माझेच शत्रू वाटतात,
स्वतःपासूनही धावले तरी हे बरोबर वाटेत गाठतात...
मला तुला विसरायचंय, हे यांना मुळी पटतच नाही,
म्हणतात, लाटेचं अन सागराचं नातं कधी तोडूनही तुटत नाही...
खरंच इतकं गहिरं आहे का रे तुझं-माझं नातं?
अजूनही का मन माझं तुझंच गाणं गातं?
तुला जायचंच आहे ना तर खुशाल निघून जा,
जाता जाता माझ्या मनातील आठवणीही घेऊन जा...
ते करशीलही; पण तुझं काय, हा पाऊस अन या वाटा तुला नाही छळणार?
शांत समुद्रातलं आठवणींचं थैमान त्यांना नाही कळणार?
म्हणूनच अजूनही तू येशील असा विश्वास आहे,
अजूनही या राधेला क्रुष्णभेटीची आस आहे...
ही वाट तुला बोलावतेय एकदा तरी मागे बघ,
खरोखरीच आकाशात भरून आलेत काळे ढग...
पाऊसही आता बघ हळूहळू निवळतोय,
तुझ्यासाठी माझ्यासारखा तोही अधीर होतोय...
हे सगळं आपलं आहे, एकदाच परत ये,
शब्द नको आता फक्त डोळ्यांनाच बोलू दे...
पावसासारखं एकदा त्यांनाही बरसायचंय,
पुन्हा एकदा तुझ्या डोळ्यात स्वतःला विसरायचंय....
नकोस आता इतकं छळू सगळा रुसवा सोडून दे,
कितीदा रे बोलवू, परत ये, परत ये...
तुझ्या कल्पनेनेसुद्धा आभाळ डोळ्यात दाटतं...
नंतर सुरु होतो तो अविरत बरसणारा उनाड पाऊस...
तो पाऊस, त्या जलधारा...सारं काही तसंच आहे अजूनही...
तोच रस्ता,त्याच वाटा...खुणावतात अजूनही...
पण का कोण जाणे मला हे सारे माझेच शत्रू वाटतात,
स्वतःपासूनही धावले तरी हे बरोबर वाटेत गाठतात...
मला तुला विसरायचंय, हे यांना मुळी पटतच नाही,
म्हणतात, लाटेचं अन सागराचं नातं कधी तोडूनही तुटत नाही...
खरंच इतकं गहिरं आहे का रे तुझं-माझं नातं?
अजूनही का मन माझं तुझंच गाणं गातं?
तुला जायचंच आहे ना तर खुशाल निघून जा,
जाता जाता माझ्या मनातील आठवणीही घेऊन जा...
ते करशीलही; पण तुझं काय, हा पाऊस अन या वाटा तुला नाही छळणार?
शांत समुद्रातलं आठवणींचं थैमान त्यांना नाही कळणार?
म्हणूनच अजूनही तू येशील असा विश्वास आहे,
अजूनही या राधेला क्रुष्णभेटीची आस आहे...
ही वाट तुला बोलावतेय एकदा तरी मागे बघ,
खरोखरीच आकाशात भरून आलेत काळे ढग...
पाऊसही आता बघ हळूहळू निवळतोय,
तुझ्यासाठी माझ्यासारखा तोही अधीर होतोय...
हे सगळं आपलं आहे, एकदाच परत ये,
शब्द नको आता फक्त डोळ्यांनाच बोलू दे...
पावसासारखं एकदा त्यांनाही बरसायचंय,
पुन्हा एकदा तुझ्या डोळ्यात स्वतःला विसरायचंय....
नकोस आता इतकं छळू सगळा रुसवा सोडून दे,
कितीदा रे बोलवू, परत ये, परत ये...
Friday, July 30, 2010
तू दूर दूर जाता...
तू दूर दूर जाता मी एकटीच राहिले,
क्षण अपुल्या सहवासाचे आठवात राहिले...
तू असा निघून जाता मी मलाच हरवून बसले,
ओंजळ माझी रिकामी,सारे निसटून गेले...
आता दाहीदिशांतून आभास तुझेच उरती,
वाट तुझी बघताना अविरत डोळे झरती...
आठवते का रे तुलाही ते पावसातले भिजणे,
रोजच्या त्या भेटी अन भेटींचे सारे बहाणे...
अजुनही पाऊस येतो, परी माझ्यासाठी नवखा,
तुझ्यावाचूनी मजला तोही वाटे परका...
मन माझे भरुन येते मेघ काळे बघूनी,
श्रावणातली रिमझिम होते नकळत माझ्या नयनी...
हातातून सुटला हात, परी जीव तसाच गुंतून होता,
कधीतरी येशील तू, ही एकच आस आता...
माझी अधीर अवस्था तुज कळतच नाही का रे?
एकच सांग मला की तू परत येशील का रे?
क्षण अपुल्या सहवासाचे आठवात राहिले...
तू असा निघून जाता मी मलाच हरवून बसले,
ओंजळ माझी रिकामी,सारे निसटून गेले...
आता दाहीदिशांतून आभास तुझेच उरती,
वाट तुझी बघताना अविरत डोळे झरती...
आठवते का रे तुलाही ते पावसातले भिजणे,
रोजच्या त्या भेटी अन भेटींचे सारे बहाणे...
अजुनही पाऊस येतो, परी माझ्यासाठी नवखा,
तुझ्यावाचूनी मजला तोही वाटे परका...
मन माझे भरुन येते मेघ काळे बघूनी,
श्रावणातली रिमझिम होते नकळत माझ्या नयनी...
हातातून सुटला हात, परी जीव तसाच गुंतून होता,
कधीतरी येशील तू, ही एकच आस आता...
माझी अधीर अवस्था तुज कळतच नाही का रे?
एकच सांग मला की तू परत येशील का रे?
Friday, April 30, 2010
पाऊस...

पाऊस...
हल्ली पाऊस आला, की कससंच होतं मला,
अशाच तर पावसात पहिल्यांदा भेटले होते तुला...
पावसाचं काय रे, तो येतो आणि निघून जातो,
पण माझं काय,
आठवांचा तो सडा हूरहूर लावून जातो माझ्या जिवाला...
पाऊस असाही...
कधी कधी या पावसाचं गणितच मला कळत नाही,
नक्की असतं तरी काय याच्या मनात?
कधी काळ्याभोर नभातूनही येत नाहीत हे महाशय,
तर कधी अवचित चमचमत्या रथातून यांची स्वारी येते लख्ख उन्हात!!!
मी आणि पाऊस...
या पावसाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे,
धरेच्या भेटीची याची ओढ बघा ना,
सूर्याच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून
हा तिला बिनधास्त भेटतो कसा,
हे मला अजूनही न उलगडलेलं कोडं आहे...
माझं आणि या पावसाचं नक्की काहीतरी वैर आहे,
तुझ्या निघायच्या वेळी यानं बरसावं असं वाटलं, तर त्यात काय गैर आहे?
पण नाही, माझ्या मनानुसार वागेल, तो पाऊस कसला?
बघ ना, काल तुला भेटायला निघताच हा अधाशासारखा बरसला !!!
तू आणि पाऊस...
तू आणि पाऊस- दोघंही सारखेच आहात...
कितीदाही भेटलात,तरी प्रत्येक भेटीत नवखे आहात...
प्रत्येक वेळी तुमच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडावंसं वाटतं,
कधी खळखळून हसावंसं, तर कधी मोकळं रडावंसं वाटतं....
Wednesday, April 28, 2010
हूरहूर...

सूर्य जसा मावळतो, दूर नदीच्या काठी,
आठविती मग मजला त्या नदीकाठच्या भेटी...
डोळ्यात आजही जपतो, स्वप्न तुझ्यासम रंगविलेले,
आळवितो आजही सूर तुझ्या संगतीत गवसलेले...
नसलीस जरी तू जगी या, हे गाणॆ तुझेच ओठी,
आठविती मग मजला त्या नदीकाठच्या भेटी...
वाजता कुणाचे पैंजण, उमटता तो मंजूळ नाद,
घुटमळते कानी माझ्या, तुझीच प्रेमळ साद,
क्षणार्धात का विरली जन्मोजन्मीची नाती,
आठविती मग मजला त्या नदीकाठच्या भेटी...
स्वप्नांच्या गावी अजुनी असते तुझीच चाहूल,
तुझ्याच दिशेला आजही आभास वळवितो पाऊल,
का क्षणोक्षणीचे झुरणॆ, केवळ एका भेटीसाठी,
आठविती मग मजला त्या नदीकाठच्या भेटी...
राहूनच गेलं...
राहूनच गेलं...
थोडं बोलायचंय बाळा जरा ऐकून घेशील?
तुझ्या आईला बोलण्यासाठी थोडासा वेळ देशील?
तू जन्माला आलास ना तेव्हा खूप स्वप्नं पाहिली तुझ्यासाठी,
पण आमचंच चुकलं,
स्वप्नं आपली’ बघ,’माझी’ नाही, हे शिकवायचं राहूनच गेलं...
परिस्थितीची झळ तुला लागू नये यासाठी पुरेपूर झटलो,
पण आमचंच चुकलं,
आमच्या कष्टांची जाणीव ठेव, हे शिकवायचं राहूनच गेलं...
तुझ्या शिक्षणात कसलीच आडकाठी ठेवली नाही,
तुला खूप मोठा झालेलं बघायचं होतं ना आम्हाला,
पण तरीही एक चुकलंच,
तुझी महत्वाकांक्षा जपताना तुला माणुस अन माणुसकी शिकवायचं राहूनच गेलं...
आता झालाही आहेस खूप मोठा, स्वतःची सगळी स्वप्नं जगणारा,
पण तुझी एक भेटही आम्हाला स्वप्नासारखी वाटते;
जरी परक्यांच्या देशात असलास
तरी आम्ही कायम तुझे आहोत ही आठवण द्यायचं राहून गेलं...
गेलास तेव्हा मेल, मेसेज सारं काही सुरळीत होतं,
पण तुझ्या जवळ असण्याची सर नव्हती रे कशाला,
तेव्हाही चुकलंच, तुझ्या प्रगतीपुढे आमच्या भावनांना आवरलं,
पण म्हणून तुझं स्वातंत्र्य जप,पण आमचाही कधीतरी विचार कर, हे शिकवायचं राहून गेलं...
मान्य आहे की आम्ही फक्त आमचं कर्तव्य केलं,
मुलांसाठी कष्ट करणं काही वेगळं नाही,
पण आम्हाला विसरु नकोस अशी शिकवण वेगळ्याने देणं तेवढं राहून गेलं...
जाण्यापूर्वी तुझे बाबा तुझेच नाव जपत होते,
तेव्हा बोलले, सगळं दिलं पोराला,
गेलेल्या क्षणाचं आणि माणसाचं महत्व सांगणं राहूनच गेलं...
जातानाही, खूप मोठा हो, हा निरोप ठेवून गेलेत, म्हणूनच हा खटाटोप करतेय,
आज तुझ्याकडे थोडा वेळ मागतेय,
बाकी बर्याच गोष्टी राहून गेल्या, जाता जाता खंत नको की चुका मान्य करायचं राहून गेलं...
तू खूप खूप मोठ्ठा हो, आशीर्वाद तर आहेच,
पण काही चुका अक्षम्य असतात,हेही शिकून घे जमलं तर;
कारण मला तर संधी मिळाली चुका मान्य करण्याची,
पण तसं झालं नाही तर ते पचवण्यासाठी लागणारं बळ तुला द्यायचंही राहूनच गेलं....
थोडं बोलायचंय बाळा जरा ऐकून घेशील?
तुझ्या आईला बोलण्यासाठी थोडासा वेळ देशील?
तू जन्माला आलास ना तेव्हा खूप स्वप्नं पाहिली तुझ्यासाठी,
पण आमचंच चुकलं,
स्वप्नं आपली’ बघ,’माझी’ नाही, हे शिकवायचं राहूनच गेलं...
परिस्थितीची झळ तुला लागू नये यासाठी पुरेपूर झटलो,
पण आमचंच चुकलं,
आमच्या कष्टांची जाणीव ठेव, हे शिकवायचं राहूनच गेलं...
तुझ्या शिक्षणात कसलीच आडकाठी ठेवली नाही,
तुला खूप मोठा झालेलं बघायचं होतं ना आम्हाला,
पण तरीही एक चुकलंच,
तुझी महत्वाकांक्षा जपताना तुला माणुस अन माणुसकी शिकवायचं राहूनच गेलं...
आता झालाही आहेस खूप मोठा, स्वतःची सगळी स्वप्नं जगणारा,
पण तुझी एक भेटही आम्हाला स्वप्नासारखी वाटते;
जरी परक्यांच्या देशात असलास
तरी आम्ही कायम तुझे आहोत ही आठवण द्यायचं राहून गेलं...
गेलास तेव्हा मेल, मेसेज सारं काही सुरळीत होतं,
पण तुझ्या जवळ असण्याची सर नव्हती रे कशाला,
तेव्हाही चुकलंच, तुझ्या प्रगतीपुढे आमच्या भावनांना आवरलं,
पण म्हणून तुझं स्वातंत्र्य जप,पण आमचाही कधीतरी विचार कर, हे शिकवायचं राहून गेलं...
मान्य आहे की आम्ही फक्त आमचं कर्तव्य केलं,
मुलांसाठी कष्ट करणं काही वेगळं नाही,
पण आम्हाला विसरु नकोस अशी शिकवण वेगळ्याने देणं तेवढं राहून गेलं...
जाण्यापूर्वी तुझे बाबा तुझेच नाव जपत होते,
तेव्हा बोलले, सगळं दिलं पोराला,
गेलेल्या क्षणाचं आणि माणसाचं महत्व सांगणं राहूनच गेलं...
जातानाही, खूप मोठा हो, हा निरोप ठेवून गेलेत, म्हणूनच हा खटाटोप करतेय,
आज तुझ्याकडे थोडा वेळ मागतेय,
बाकी बर्याच गोष्टी राहून गेल्या, जाता जाता खंत नको की चुका मान्य करायचं राहून गेलं...
तू खूप खूप मोठ्ठा हो, आशीर्वाद तर आहेच,
पण काही चुका अक्षम्य असतात,हेही शिकून घे जमलं तर;
कारण मला तर संधी मिळाली चुका मान्य करण्याची,
पण तसं झालं नाही तर ते पचवण्यासाठी लागणारं बळ तुला द्यायचंही राहूनच गेलं....
Friday, January 29, 2010
समजूत...
का बरे मी प्रेमात पडलो, असा प्रश्नच मुळी मला पडत नाही,
तू असलीस काय, नसलीस काय, माझं काहीच अडत नाही...
समोर असलीस की डोळे भरून बघून घेतो तुला,
नसलीस की तुझ्या आठवणीत जगून घेतो तुला,
असण्या-नसण्याच्या सीमांच्या व्याख्येत माझं प्रेमच बसत नाही,
तू असलीस काय, नसलीस काय, माझं काहीच अडत नाही...
आजही रोज संध्याकाळी नकळत तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसतो,
कधीतर चक्क आपल्या नेहमीच्या ठिकाणीही जाऊन बसतो,
माझ्या वागण्याचे कधी मलाच संदर्भ लागत नाहीत,
तू असलीस काय, नसलीस काय, माझं काहीच अडत नाही...
तू येणार नाहीस हे माहीत असतं मला, तरीही वाटतं,
येशीलच ऐकून माझी अधीर साद...
चंद्र-चांदण्यांतही असतील ना गं काही वाद,
पण तरीही चंद्र आकाशात आला, की चांदणंही आल्याशिवाय राहत नाही,
तू असलीस काय, नसलीस काय, माझं काहीच अडत नाही...
शिकलोय मी आता तुझ्यावाचून जगणं,
तुझ्या भासांच्या जाळ्यात स्वतःला गुरफटून टाकणं,
आता कधी मला तुझं नसणं सलत नाही,
कारण तेव्हा जणु माझाच मी उरत नाही,
तू असलीस काय, नसलीस काय, माझं काहीच अडत नाही...
का बरे मी प्रेमात पडलो, असा प्रश्नच मुळी मला पडत नाही....
Tuesday, January 26, 2010
तू...
हिंदू ना मुस्लिम ना, ना शीख ना ईसाई तू,
जन्म या मातीत दिधला जन्मदात्री आई तू...
देव अससी तूच आम्हा अस्मितेची शान तू,
धरणीलाही गौरविसी सर्वोच्च तू सन्मान तू...
पारतंत्री दीनदुबळ्यांच्या कळा असहाय तू,
परि जोखडाशी झुंजणाऱ्या वीरांची देखील माय तू...
झुंजले रणांगणी जे खड्गाची त्यांच्या धार तू,
मुक्त परि खचल्या जनांचा उद्धारता आधार तू...
शत्रूलाही रोखणाऱ्या हिमनगापरि अचल तू,
कवींची तू प्रेरणा, सुफल तू अन सुजल तू...
प्रखर सूर्यासम तळपते तेज तू अन दिव्य तू,
प्राणाहूनी तू प्रिय आम्हा धन्य तू अन वंद्य तू...
क्षण
दाट धुक्यातील पहाट्वेळी दंवासारखा आला क्षण,
ओंजळीत टिपता टिपता अलगद निसटून गेला क्षण...
कधी आठवांचे सडे घेऊनी चिंब भिजविण्या आला क्षण,
भानावर येता नयनी गहिवर ठेवून गेला क्षण...
कधी सुखाने पूर्ण ओंजळी,दुःखची कधी रेघही काळी,
हसऱ्या मेघांनाही ह्ळवी किनार देऊन गेला क्षण...
अवखळ झऱ्य़ागत बाल्यही सरले, तारुण्याचे वळणही आले,
या वळणावर वार्धक्याची चाहूल लावून गेला क्षण...
गुणगुणली प्रीतीची गाणी,साथ तिची जणु धुंद चांदणी,
चांदण्यात न्हाता विरहाची रणरण भोगून गेला क्षण...
जगताना मग हळवे अधीरे, आयुष्याचे काव्यही अधुरे,
शेवटच्या मग ओळीसंगे अंत घेऊनी आला क्षण..
तरीही एकच असे सांगणे, जगण्याचे या रुप देखणॆ,
जगून घेऊया आणखी थोडे विसरून हे सारे मीपण,
त्यावर भाळून जाण्यासाठी अजूनी एकच मिळता क्षण..
Monday, January 25, 2010
सलाम !!!
रक्तात जयाच्या धैर्य अन शस्त्र जयाच्या हाती,तो देशासाठी जगतो मरतो तो देशासाठी...
झाले कितीक हुतात्मे, कितीच हो बलिदानी,
रंगल्या कितीक वीरश्री, इतिहासाच्या पानोपानी...
तेजस्वी परंपरेची धुरा घेऊनी हाती,
तो देशासाठी जगतो मरतो तो देशासाठी...
संपन्न मायभू ही समरांगण जेव्हा होते,
शत्रुत्वाच्या आघाताने, असहाय ती विव्हळते,
मातीतही मिसळून जाई, करी शत्रूचीही माती,
तो देशासाठी जगतो मरतो तो देशासाठी...
अजुनी कातरवेळी जीव आईचा तीळतीळ तुटतो,
चिंतेने व्याकुळ नेत्री, अश्रुंचा पाझर फुटतो,
अर्पिते बाळ स्वतःचा ती मात्रुभूमीच्यासाठी,
तो देशासाठी जगतो मरतो तो देशासाठी...
गावे किती हे पवाडे, तव शौर्य कसे वर्णावे,
तुमच्या अतुल ॠणाला उतराई कैसे व्हावे,
नतमस्तक आम्ही होतो, हा ’सलाम’ तुमच्यासाठी,
तो देशासाठी जगतो मरतो तो देशासाठी...
Friday, January 22, 2010
मनसोक्त जगून घ्यावं...
नाजुकशा कळीचं ते मोहक हास्य,फुलणाऱ्या फुलाचं ते अबोल भाष्य,
डोळ्यात सारं साठवून मिटून घ्यावं,
जे आहे आज आहे, मनसोक्त जगून घ्यावं...
काळोखाच्या शालीवर तारकांची कोरीव नक्षी,
अनंत आकाशी भरारी घेती छोटे छोटे पक्षी,
छोट्याशा मनातील स्वप्नांना मग आशेचं बळ द्यावं,
जे आहे आज आहे, मनसोक्त जगून घ्यावं...
वाट बघणारा श्रीकॄष्ण घाली राधिकेला सुमधूर साद,
बासरीच्या सुराकडे खेचला जाई तिच्या पैंजणांचा नाद,
हळूवार या नादावर कधी आपलंही मन थिरकावं,
जे आहे आज आहे, मनसोक्त जगून घ्यावं...
सरला जरी ऋतू, जरी नसला कधी बहर,
येतील दिवस चैतन्याचे,घेऊन नव्या पालवीचा मोहर,
निसर्गाचं हे गुपित जरा आपणही जाणून घ्यावं,
जे आहे आज आहे, मनसोक्त जगून घ्यावं...
खंत...
रम्य पहाट,पक्ष्यांचे कूजन, पानांची सळसळ नि भूपाळ्यांचॆ स्वर,
राऊळीच्या घंटा कुठे खळखळ पाणी, सारे कामावर जाती,गजबज रस्त्यावर...
डोळा सवयीचे झाले असे दॄश्य रोजचे हे,रोजचा तो सूर्य त्याचे उगवणे रोजचे हे...
सारे होते सुरळीत त्यास नजर लागली
ती ’रोजची’ पहाट पुन्हा नाही उगवली...
डोळे आतुरले पार ती सकाळ पाहण्या,
फार पूर्वीची सकाळ आता सकाळ नुरली...
भास्कराचे आता असे फक्त येणे-जाणे,
दुनियेची कसरत परके होऊन पाहणे...
त्याची चूक तरी काय त्यास सवय प्रेमाची,
त्याच्या प्रेमाची आता जागा पैशाने घेतली...
फार पूर्वीची सकाळ आता सकाळ नुरली...
नाही मोकळे आकाश स्वर प्रार्थनेचे हरवले,
भांडणाचे सूर आता बंद जगात राहिले,
जीव लावणारी बोली जीवघेणी भाषा झाली,
फार पूर्वीची सकाळ आता सकाळ नुरली...
घंटानाद हा कसला आता फक्त असे वाद,
मंदिर मशिदीसाठी आता आपसांचे घात...
रांगोळीच्या जागी आता थारोळीच आली...
फार पूर्वीची सकाळ आता सकाळ नुरली...
काळ गेला आता जेव्हा होते नद्यातून पाणी,
नव्ह्त्या सीमा आकाशाला, दाहिदिशी मंजूळ गाणी...
आज उजाड माळरानी रक्तांचे पाट आले,
त्वेषापायी आकाशही गेले विभागले...
हर दिशाही आता वेदनेने विव्हळली...
फार पूर्वीची सकाळ आता सकाळ नुरली...
राऊळीच्या घंटा कुठे खळखळ पाणी, सारे कामावर जाती,गजबज रस्त्यावर...
डोळा सवयीचे झाले असे दॄश्य रोजचे हे,रोजचा तो सूर्य त्याचे उगवणे रोजचे हे...
सारे होते सुरळीत त्यास नजर लागली
ती ’रोजची’ पहाट पुन्हा नाही उगवली...
डोळे आतुरले पार ती सकाळ पाहण्या,
फार पूर्वीची सकाळ आता सकाळ नुरली...
भास्कराचे आता असे फक्त येणे-जाणे,
दुनियेची कसरत परके होऊन पाहणे...
त्याची चूक तरी काय त्यास सवय प्रेमाची,
त्याच्या प्रेमाची आता जागा पैशाने घेतली...
फार पूर्वीची सकाळ आता सकाळ नुरली...
नाही मोकळे आकाश स्वर प्रार्थनेचे हरवले,
भांडणाचे सूर आता बंद जगात राहिले,
जीव लावणारी बोली जीवघेणी भाषा झाली,
फार पूर्वीची सकाळ आता सकाळ नुरली...
घंटानाद हा कसला आता फक्त असे वाद,
मंदिर मशिदीसाठी आता आपसांचे घात...
रांगोळीच्या जागी आता थारोळीच आली...
फार पूर्वीची सकाळ आता सकाळ नुरली...
काळ गेला आता जेव्हा होते नद्यातून पाणी,
नव्ह्त्या सीमा आकाशाला, दाहिदिशी मंजूळ गाणी...
आज उजाड माळरानी रक्तांचे पाट आले,
त्वेषापायी आकाशही गेले विभागले...
हर दिशाही आता वेदनेने विव्हळली...
फार पूर्वीची सकाळ आता सकाळ नुरली...
Subscribe to:
Comments (Atom)
