क्षण
दाट धुक्यातील पहाट्वेळी दंवासारखा आला क्षण,
ओंजळीत टिपता टिपता अलगद निसटून गेला क्षण...
कधी आठवांचे सडे घेऊनी चिंब भिजविण्या आला क्षण,
भानावर येता नयनी गहिवर ठेवून गेला क्षण...
कधी सुखाने पूर्ण ओंजळी,दुःखची कधी रेघही काळी,
हसऱ्या मेघांनाही ह्ळवी किनार देऊन गेला क्षण...
अवखळ झऱ्य़ागत बाल्यही सरले, तारुण्याचे वळणही आले,
या वळणावर वार्धक्याची चाहूल लावून गेला क्षण...
गुणगुणली प्रीतीची गाणी,साथ तिची जणु धुंद चांदणी,
चांदण्यात न्हाता विरहाची रणरण भोगून गेला क्षण...
जगताना मग हळवे अधीरे, आयुष्याचे काव्यही अधुरे,
शेवटच्या मग ओळीसंगे अंत घेऊनी आला क्षण..
तरीही एकच असे सांगणे, जगण्याचे या रुप देखणॆ,
जगून घेऊया आणखी थोडे विसरून हे सारे मीपण,
त्यावर भाळून जाण्यासाठी अजूनी एकच मिळता क्षण..

Pallavi Namskar,
ReplyDeletekhup sundar kavita ahe......
tuzi ahe ki ajun konachi?