तू दूर दूर जाता मी एकटीच राहिले,
क्षण अपुल्या सहवासाचे आठवात राहिले...
तू असा निघून जाता मी मलाच हरवून बसले,
ओंजळ माझी रिकामी,सारे निसटून गेले...
आता दाहीदिशांतून आभास तुझेच उरती,
वाट तुझी बघताना अविरत डोळे झरती...
आठवते का रे तुलाही ते पावसातले भिजणे,
रोजच्या त्या भेटी अन भेटींचे सारे बहाणे...
अजुनही पाऊस येतो, परी माझ्यासाठी नवखा,
तुझ्यावाचूनी मजला तोही वाटे परका...
मन माझे भरुन येते मेघ काळे बघूनी,
श्रावणातली रिमझिम होते नकळत माझ्या नयनी...
हातातून सुटला हात, परी जीव तसाच गुंतून होता,
कधीतरी येशील तू, ही एकच आस आता...
माझी अधीर अवस्था तुज कळतच नाही का रे?
एकच सांग मला की तू परत येशील का रे?

khupach chhan aahe ,bahot achche se apne jazbaaton ko labzon mein utara hai, wah wah wah!
ReplyDeleteHmmmmmm.. Made me sad.....
ReplyDelete